राज्यात आज १५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई: राज्यात आज (४ ऑक्टोबर) बऱ्याच दिवसांनंतर १५ हजारांच्या आत कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात आज १३,७०२ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आजही बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज १५,०४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
सध्या राज्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १४,४३,४०९ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत ३८,०८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ११,४९,६०३ रुग्णांने आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील रिकव्हरी रेट ७९.६४ टक्के इतका झाला आहे. तर मुंबईत आज २१०९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra reports 13,702 new #COVID19 cases, 326 deaths and 15,048 discharges today. Total cases in the state rise to 14,43,409, including 38,084 deaths and 11,49,603 discharges. Active cases stand at 2,55,281: State Health Department pic.twitter.com/2It5OD4h1m
— ANI (@ANI) October 4, 2020
Mumbai recorded 2,109 new COVID-19 cases and 48 deaths today, taking the number of active cases to 28,904 and death toll to 9,105: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) pic.twitter.com/N2slFAyFjz
— ANI (@ANI) October 4, 2020
