प्रशासन ठप्प, पालकमंत्री गायब… याला म्हणतात ठाकरे सरकार ; नितेश राणेंची टीका
मुंबई : मुंबई : प्रशासन ठप्प, पालकमंत्री गायब… याला म्हणतात ठाकरे सरकार, अशा शब्दांत नितेश राणे यांनी ठाकरे सरकावर प्रहार केला आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दरवर्षी लाखो चाकरमानी मुंबई, पुण्यासारख्या शहरांतून कोकणातील आपल्या गावी गणेशोत्सव साजरा करायला जात असतात. राज्य सरकारने कोणतीही सोय वा स्पष्टता न केल्याने, कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांना याचा फटका बसत आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी आता यासंदर्भात ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
आज ४ ऑगस्ट उजाडला तरी महाराष्ट्र सरकार गणेशचतुर्थीसाठी कोकणात जाणाऱ्या जनतेसाठी काहीच बोलत नाही आहे, असा सवाल विचारत त्यांनी सामान्य नागरिकांना तोंड द्यावे लागत असलेल्या परिस्थितीचे वर्णनदेखील केले आहे. वाऱ्यावर सोडले आहे… ई-पासच्या नावाने लूट सुरू आहे.
आज ४ ऑगस्ट उजाडला तरी महाराष्ट्र सरकार गणेश चतुर्थी साठी कोकणात जाणाऱ्या जनतेसाठी काहीच बोलत नाही आहे?
वाऱ्यावर सोडले आहे..
E pass च्या नावाने लुट सुरु आहे..
गावात गोंधळ सुरु आहे..
प्रशासन ठप्प! पालकमंत्री गायब!!याला म्हणतात ठाकरे सरकार !!
— Nitesh Rane (@NiteshNRane) August 4, 2020
गावात गोंधळ सुरू आहे. प्रशासन ठप्प! पालकमंत्री गायब!! याला म्हणतात ठाकरे सरकार !” अशा शब्दांत ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत व रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यावर जळजळीत टीकाही केली .



