अधिवेशन
गोरगरिबांची २ हजार ८०८ हेक्टर जमीन विकासकांच्या घशात घालण्याचा सरकारचा घाट – आमदार जयंत पाटील
मुंबईतील गोरगरिबांसाठी घरे बांधायची २ हजार ८०८ हेक्टर जमीन विकासकांच्या घशात घालण्याचा घाट सरकारने घातला असून यात २० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. दोन दिवस महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांना लक्ष्य केल्यानंतर आता विरोधकांनी आपला मोर्चा मुख्यमंत्र्यांकडे वाळवल्याचे दिसत आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवडय़ात सरकारशी जुळवून घेण्याची भूमिका घेणारे विरोधकच आता सरकारवर आक्रमक झाल्याचे दिसत आहे.