‘हा’ फरक आहे माघी गणपती आणि गणेश चतुर्थी यामध्ये!
जानेवारी / फेब्रुवारी मध्ये येणार्या हिंदु दिनदर्शिकेच्या माघ महिन्यात माघी गणपती साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यात (ऑगस्ट / सप्टेंबर) भारतभर साजरा होणाया गणेश चतुर्थी या लोकप्रिय उत्सवापेक्षा गणेश जयंती वेगळी आहे. काही परंपरेनुसार गणेश चतुर्थीला गणपतीचा वाढदिवसही मानला जातो.
प्राचीन प्रथा सांगतात की गणेश जयंतीनिमित्त भाविकांना चंद्राकडे पाहण्यास मनाई आहे कारण यामुळे दर्शकां सोबत दुर्दैवी घटना होते. जर या दिवशी चुकून एखाद्या व्यक्तीला चंद्राचे दर्शन झाले तर त्यांना उर्वरित दिवस उपवास करावा लागेल आणि भगवान गणेशची प्रार्थना करावी लागेल.
गणपतीने चंद्राला दिलेला शाप
गणेश जयंती इतिहासामध्ये एक कथाही आहे. या कथेत असे म्हटले आहे की चंद्रदेवने आपल्या दिसण्यामुळे भगवान गणेशची चेष्टा केली. हत्तीचे डोके असल्यामुळे त्याने त्याला छेडले. चंद्र देव त्याच्या सुंदर दिसण्याविषयी आणि तेजाविषयी गर्व असतो यामुळे भगवान गणेश संतप्त होवून चंद्र देव यांचा अहंकार मोडून काढण्यासाठी त्यांनी त्याला शाप दिला, गणेशाने चंद्रदेवला शाप दिला की तो कोणासही दिसणार नाही आणि ज्या दिसण्याचा त्याला गर्व आहे ते तेज कोणालाही दिसणार नाही. चंद्र देव यांना त्यांच्या वागण्याबद्दल लाज वाटली आणि त्याने क्षमा मागितली . तेव्हा गणेश म्हणाला की तो त्याचा शाप परत घेऊ शकत नाही परंतु तो बदलू शकतो. ते म्हणाले की चंद्र १५ दिवसांनी कलेकलेने वाढेल आणि पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण दिसेल.
गणेश चतुर्थी आणि माघी गणपती यातील फरक
गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी हे अधिक लोकप्रिय आहेत. भारतीय गणेश चतुर्थी उत्सव आणि माघी गणपती यातील फरक असा आहे की गणेश चतुर्थी हा सण ऑगस्ट / सप्टेंबरमध्ये (भाद्रपद हिंदू महिन्यात) पाळला जातो. परंपरेनुसार, गणेश चतुर्थी हा गणेशचा वाढदिवस म्हणूनही गणला जातो. गणेशाच्या या सणाला उत्तर प्रदेशातील तिलो चौथ आणि सकट चौथीस असेही म्हटले जाते, जेथे गणेशाला एका मुलाच्या वतीने बोलावले जाते. याला महाराष्ट्रात तीळकंद चतुर्थी असेही म्हणतात.

