Politicsराजकारणसोशल मीडिया

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे ‘महाराष्ट्र द्रोही’ ठरविणार का? फडणवीसांचा सवाल

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा बंगला आणि तिच्या कार्यालयावर महापालिकेने केलेली ही कारवाई बेकायदा असल्याचा निर्वाळा आज मुंबई हायकोर्टाने दिला आहे. तर दुसरीकडे अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना दिवाळीआधी सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. गोस्वामी यांना जामीन देण्यामागील कारणांचा सर्वोच्च न्यायालयानं उलगडा केला. जर आरोपी पुराव्यांमध्ये छेडछाड करू शकतो वा आरोपी पळून जाऊ शकतो किंवा गुन्हा करण्याची शक्यता असेल, यावरून आरोपीला तुरुंगात ठेवायची गरज आहे की नाही हे सगळं नंतर समोर आलं आहे.

सध्या हे प्रकरण एका नागरिकाच्या स्वातंत्र्याबद्दल आहे-  असं सर्वोच्च न्यायालय म्हणालं. आणि यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. एकाच दिवशी देशातील दोन न्यायालयांचे निकाल एकप्रकारे सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत. आता प्रश्न असा आहे की, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयालासुद्धा हे ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का? असा प्रश्न उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर प्रहार केला आहे. आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे, याचा विसर या राज्य सरकारला पडला.

पोलीस, फौजदारी कायदे हे जनतेच्या संरक्षणासाठी असतात, त्यांच्या छळवणुकीसाठी नाहीत.  हे जर न्यायालयांना सांगावे लागत असेल, तर आपली सदसद्विवेकबुद्धी संविधानाला स्मरून घेतलेली शपथ गहाण ठेवली का? हा प्रश्न निर्माण होतो, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केली आहे. सत्तेतील नेते सत्तांध झाल्याने ज्या घटना अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडल्या, त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निकाल ही सरकारला सणसणीत चपराक आहे. सरकारविरोधी निघणारा प्रत्येक आवाज हा अशा प्रकारे चिरडून टाकता येत नसतो, हे आता तरी त्यांनी लक्षात घ्यावे, असा खोचक टोलाही त्यांनी ठाकरे सरकारवर लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. ठाकरे सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर विरोधक नाराजी व्यक्त करत असून टीका करत आहेत. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

एकाच दिवशी आलेले निकाल सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत असं ते म्हणाले आहेत. त्यांनाही महाराष्ट्रद्रोही ठरवणार का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन महापालिकेला फटकारलं असून दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी अटकेवरुन ठाकरे सरकारला फटकारलं आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “एकाच दिवशी देशातील दोन न्यायालयांचे निकाल एकाप्रकारे सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत. आता प्रश्न असा आहे की, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का?”.

“आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे, याचा विसर या राज्य सरकारला पडला. पोलिस, फौजदारी कायदे हे जनतेच्या संरक्षणासाठी असतात, त्यांच्या छळवणुकीसाठी नाहीत, हे जर न्यायालयांना सांगावे लागत असेल, तर आपली सदसदविवेक बुद्धी-संविधानाला स्मरून घेतलेली शपथ गहाण ठेवली का,हा प्रश्न निर्माण होतो,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button