बंगालसहीत ५ राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर!
नवी दिल्ली: आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशाचा समावेश आहे. या राज्यांमधील निवडणुका पाहता निवडणूक आयोगाच्या पथकांनीही नुकतीच या राज्यांना भेटी दिल्या आहेत.
निवडणुकांच्या तारखा खालील प्रमाणे असतील:
आसाममध्ये २७ मार्च रोजी होणार असून तीन टप्प्यात मदतदान होणार.
केरळमध्ये एकाच टप्प्यात विधानसभेची निवडणूक होणार. ६ एप्रिल रोजी मतदान तर २ मे रोजी निकाल जाहीर.
तामिळनाडूमध्ये सुद्धा एकाच टप्प्यात निवडणूक होणार. केरळ प्रमाणेच मतदान ६ एप्रिलला तर २ मेला निकाल. केरळ आणि तामिळनाडू एकाच दिवशी होणार.
पश्चिम बंगलामध्ये आठ टप्प्यात निवडणूक, ७ मार्चला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार.
तामिळनाडू, केरळ, पुदुचेरीच्या निवडणुका एकाच टप्प्यात ६ एप्रिल रोजी होणार आहेत
पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार
पहिला टप्पा – २७ मार्च मतदान
दुसरा टप्पा – १ एप्रिल मतदान
तिसरा टप्पा – ६ एप्रिल मतदान
चौथा टप्पा – १० एप्रिल मतदान
पाचवा टप्पा – १७ एप्रिल मतदान