शिवजयंती २०२१ : महाराष्ट्राचा शिवजयंतीचा अभिमानी सोहळा !
छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिवस निमित्त प्रत्येक वर्षी १९ तारखेला शिवजयंती साजरी केली जाते. मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणून छ्त्रपती शिवाजी महाराज ओळखले जातात. हा दिवस विशेषत: महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरा केला जातो. हे वर्ष छ्त्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती म्हणून साजरी केली जाईल.
महाराजांचा जन्म १६३० मध्ये पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. महाराज आपल्या बुद्धिमत्तेसाठी परिचित होते आणि महाराष्ट्राच्या कोकण बाजूच्या बचावासाठी “नौदल ” ही संकल्पना त्यांनी पहिले भारतीय राज्यकर्ते म्हणून मांडली होती. त्यांनी आपल्या मावळ्यांमध्ये बर्याच मुस्लिम मावळ्यांना कामावर घेतले , ते धर्मनिरपेक्ष होते.
छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देवी शिवाई यांच्या नावावरुन ठेवले गेले. महाराज हे प्रगत आणि सुसज्ज नागरी प्रशासन व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रसिध्द आहेत. १६७४ मध्ये, मराठा साम्राज्याचा छत्रपती किंवा सम्राट म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला. त्या काळात सर्वसामान्य अशी पर्शियन भाषा वापरण्याऐवजी शिवाजींनी न्यायालय व प्रशासनात मराठी व संस्कृतच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे ठरविले.
हा दिवस पुण्यातील महात्मा ज्योतिराव फुले यांनी १८७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती म्हणून साजरा करण्यास सुरवात केली. महात्मा ज्योतिरावांनी पुण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर रायगडवर शिवाजी महाराजांची समाधी शोधली होती. स्वातंत्र्यसैनिक बाळ गंगाधर टिळक यांनी नंतर या परंपरेचे अनुसरण केले आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकून लोकप्रिय केली.
शिवप्रेमींसाठी ‘ही’ सरकारची सूचना
यावर्षी कोविड-१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे. दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
तसेच कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. कोविड-१९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.