Festival (फेस्टिव्हल)

म्हणून, या दिवसाला ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’, असे म्हणतात! जाणून घ्या महत्त्व!

प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी योग असतात. दोन्ही चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहेत. शुक्ल पक्षावर पडणार्‍या चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला ‘संकष्टी चतुर्थी’ म्हणतात. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी आज, २ मार्च रोजी आहे. जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला ‘अंगारकी चतुर्थी’ म्हणून म्हटले जाते. म्हणून, या दिवसाला ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’, असे म्हणतात.

अंगारकी चतुरथीची कथा सांगताना असे सांगितले जाते की, एकदा माता पार्वती आणि भगवान शिव नदीजवळ बसले होते, तेव्हा अचानक माता पार्वतींनी चौपद खेळण्याची इच्छा व्यक्त केली. पण समस्या अशी होती की, खेळामध्ये निर्णय घेणार्‍याची भूमिका बजावण्यासाठी दुसरा कोणीही व्यक्ती नव्हता. हा प्रश्न सोडवण्यासाठी शिव आणि पार्वती यांनी मिळून मातीची मूर्ती बनविली आणि त्याला जीवदान दिले.दोघांनीही मातीपासून बनवलेल्या या मुलाला हा खेळ पाहण्याचा आदेश दिला. तसेच, कोण जिंकला आणि कोण हरला, हे ठरवण्याचा आदेश दिला. हा खेळ सुरू झाला, ज्यामध्ये माता पार्वतीने भगवान शिव यांना वारंवार पराभूत करून विजय मिळवला. हा खेळ सुरूच राहिला, पण एकदा मुलाने चुकून माता पार्वतीला हरल्या, असे म्हटले.

मुलाच्या या चुकीमुळे माता पार्वतीला खूप राग आला, म्हणून तिने रागाने त्या मुलाला शाप दिला आणि तो लंगडा झाला. आपल्या चुकीबद्दल मुलाने मातेकडे खूप दिलगिरी व्यक्त केली. मग माता पर्वती म्हणाली की, आता शाप परत घेऊ शकत नाही, पणमी एक उपाय सांगू शकते ज्यामुळे तू शाप मुक्त होशील. माता म्हणाली की, काही मुली संकष्टीदेवाशी या ठिकाणी पूजेसाठी येतात, तुम्ही त्यांना उपवासाची पद्धत विचारा आणि ते व्रत प्रामाणिकपणे करा.

व्रत करण्याची पद्धत जाणून घेत, त्यांनी आदरपूर्वक आणि नियमांनुसार व्रत केले. भगवान गणेश त्यांचा उपासनेवर प्रसन्न झाले व त्यांची इच्छा विचारली. मुलाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. गणेशाने त्या मुलाची मागणी पूर्ण केली आणि त्याला शिवलोकी धाडले. अशाप्रकारे ‘संकष्टी चतुर्थी’ व्रत पाळणाऱ्यांची सर्व मनोकामना पूर्ण होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button