मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला होता . मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच पोलिसांकडून सोमवारी रोखण्यात आले. यावेळी एका बसवरील भगवा झेंडा काढण्यात आल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हटले की, भगवा काढून बस रवाना केली…धक्कादायक! हे कोणत्या प्रकारचं राजकारण करत आहे सरकार…उद्धवजी आणि पवार साहेब दोघांनाही याचं उत्तर द्यावं लागेल! काँग्रेस तर पूर्वीपासून हेच करते मात्र या लोकांकडून अशी अपेक्षा नव्हती, अशी टीका पाटील यांनी केली आहे .
भगवा काढून बस रवाना केली…
धक्कादायक!
हे कोणत्या प्रकारचं राजकारण करत आहे सरकार…
उद्धव जी आणि पवार साहेब दोघांनाही याचं उत्तर द्यावं लागेल!
काँग्रेस तर पूर्वीपासून हेच करते मात्र या लोकांकडून अशी अपेक्षा नव्हती.महाराष्ट्र याचं उत्तर नक्कीच देतील !@OfficeofUT @PawarSpeaks pic.twitter.com/wn8Dm6UL4C
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 15, 2020
