Maharashtra Gov

तोंडाला मास्क नसेल तर मुंबईत बस, टॅक्‍सी, रिक्षात प्रवेशबंदी

मुंबई: मुंबईकरांमध्ये मास्क न लावताच फिरण्याची बेफिकिरी वाढत असल्याने महापालिका विनामास्कविरोधी कारवाई अधिक तीव्र करणार आहे. चेहऱ्यावर मास्क नसेल तर सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍थेतील बेस्ट बस, रिक्षा, टॅक्‍सीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. ‘मास्‍क नसल्‍यास प्रवेश मिळणार नाह‍ी’, अशा आशयाचा मजकूर असणारे पोस्टर्स ठिकठिकाणी लावण्‍यात आले आहेत.

करोना नियंत्रणात आणण्याच्या उपाययोजनांमध्ये मास्क लावावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. मात्र अनेक मुंबईकर मास्क न लावताच घराबाहेर पडत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही फिरत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे करोना संसर्ग आणखी वाढतो आहे. पालिकेने मागील पाच महिन्यांपासून सुरू केलेल्या विनामास्कविरोधी कारवाईत आत्तापर्यंत ६,६७२ गुन्हे नोंदविण्यात आले असून ५३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सुरुवातीला विनामास्कविरोधी कारवाईत एक हजार रुपये दंड आकारला जात होता. हा दंड जास्त असून कमी करण्याची विनंती पालिकेला केल्यानंतर तो आता २०० रुपये झाला आहे.

मुंबईतील सर्व कार्यालये, आस्‍थापना, मॉल्‍स, सोसायटी, सभागृह इत्‍यादी ठिकाणी ‘मास्‍क नाही, प्रवेश नाही’; ‘नो मास्‍क, नो एन्‍ट्री’ अशा आशयाचे फलक लावण्‍याचे निर्देश पालिका आयुक्‍त इक्‍बालसिंह चहल यांनी नुकतेच एका बैठकीत दिले होते. याशिवाय मास्क वापरणे किती आवश्यक आहे याबाबत जनजागृती करावी. मात्र विनामास्क फिरणाऱ्यांना कारवाईचा धाक राहील यासाठी कारवाई, गस्त वाढवावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button