FeaturedPoliticsमुंबईसोशल मीडिया

मुंबई पोलिसांना कुणी काम करू दिलं नाही ? ; आशिष शेलारांचा अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा

मुंबई: सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने देताच भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला .

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले .

शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की , ‘पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही. हा ‘सिंघम’चा डायलॉग शंभर टक्के खरा आहे. पण सुशांतसिंह रजपूतच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी का ठरवले नाही? कुणी त्यांना ठरवू दिले नाही? कुणी त्यांना त्यांच्या नावलौकिक आणि ख्यातीप्रमाणे काम करू दिले नाही? मुंबई पोलिसांना कुणी बोलू दिले नाही? पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले असतात, पण सुशांतच्या प्रकरणात अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का? सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे दिला. या प्रकरणी आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?,’ अशा प्रश्नांची सरबत्ती शेलार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button