बृहन्मुंबई महानगरपालिका - BMC
पाच वर्षांत ३२८ जणांचा बुडून मृत्यू
माहितीचा अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मागील पाच वर्षांत गटारे, मॅनहोल आणि समुद्रात बुडून किती दुर्घटना झाल्या याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे मागितली होती. या माहितीनुसार मुंबईत २०१३ ते २०१८ या पाच वर्षांत गटारे, मॅनहोल आणि समुद्रात बुडण्याच्या ६३९ दुर्घटना घडल्या व या ६३९ घटनांमध्ये ३२८ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या दुर्घटना रोखण्यासाठी पालिका आता काय पाऊल उचलणार की नाही हाच प्रश्न सर्वत्र निर्माण झाला आहे.
