Maharashtra Govमुंबईशिक्षणसोशल मीडिया

महाविकासआघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने!; अंतिम वर्षांच्या परिक्षेबाबत निर्णय झाला

मुंबई : अंतिम वर्षाच्या परिक्षेवरून राजकीय पटलावर अनेक गुंते पाहायला मिळाले. यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला अनेक प्रश्नांनी घेरले होते. राजभवनालाही या विषयाकडे जातीने लक्ष द्यावे लागले होते. एवढेच नाही तर, अंतिम वर्षाच्या परिक्षा होणार की नाही याविषयी ठाकरे सरकार निश्चित काही सांगत नाहीत ठाकरे सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत असे अनेक आरोप झेलल्यानंतर ठाकरे सरकारने अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

याविषयी उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे, अशी घोषणा तनपुरे यांनी केली आहे.

‘महाविकासआघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने! अंतिम वर्ष परीक्षांबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबतही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय रेग्युलेटरी बॉडींना कळवण्याचा निर्णय झाला,’ असं ट्वीट प्राजक्त तनपुरे यांनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button