सुप्रीम कोर्टाने दिली कृषी कायद्यांना स्थगिती ; शरद पवार म्हणाले
मुंबई : नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरु असतानाच सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय देत कायद्यांच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिली. सुप्रीम कोर्टाने तोडग्यासाठी चार सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमली आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “नव्या कृषी कायद्यांच्या अमलबजावणीला स्थगिती देण्याच्या तसंच चार सदस्यांची समिती तयार करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतो. हा शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा आहे . सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये ठोस चर्चा होईल अशी अपेक्षा शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात ठेवून ही चर्चा होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
It is a big relief for farmers' and I hope that a concrete dialogue between Central government and farmers' will be initiated now, keeping the farmers' interests and well being in mind.#FarmLaws #SupremeCourtofIndia
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 12, 2021